





Price: ₹350 - ₹229.00
(as of May 02, 2026 05:53:16 UTC – Details)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या विचारप्रवर्तक विधानातून एका न्यायनिष्ठ समाजाची संकल्पना मांडतात, जिथे श्रद्धा आणि तिरस्कार यांऐवजी करुणा व मानवता असेल. त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती ‘Annihilation of Caste’ अर्थात ‘जातिव्यवस्थेचे उच्चाटन’ भारतीय सामाजिक रचनेवर कठोर टीका करते आणि विशेषतः तथाकथित खालच्या जातींवर झालेल्या अमानुष वागणुकीचा तीव्र निषेध करते.
आपल्या निर्भीड आणि वादग्रस्त विचारांमुळे त्यांना हे प्रभावी व्याख्यान देण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही डॉ. आंबेडकरांनी धाडसाने हे व्याख्यान स्वतः प्रकाशित केले आणि त्यामुळे समाजात प्रचंड खळबळ उडाली. ब्राह्मणवादी जातिव्यवस्था आणि पारंपरिक हिंदू सामाजिक संरचनेला थेट आव्हान देत, हे व्याख्यान प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळणाऱ्या समाजाची ठाम मांडणी करते.
या महत्त्वपूर्ण पुस्तकात महात्मा गांधींनी मांडलेल्या ‘हरिजन’ संकल्पनेच्या विरुद्ध डॉ. आंबेडकरांनी त्यांचे जातिविषयक विचार स्पष्टपणे मांडले आहेत. या दोन प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमधील वैचारिक संवाद आणि मतभेद यांचा अभ्यास करताना, हे पुस्तक भारतीय समाजातील जातिप्रश्नाच्या मूळ स्वरूपावर प्रकाश टाकते आणि महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी प्रदान करते.
संवैधानिक नैतिकता ही नैसर्गिक भावना नसते; ती जोपासावी लागते. आपल्या लोकांनी ती अजून शिकायची आहे, हे आपण जाणले पाहिजे. भारतातील लोकशाही ही केवळ वरवरची सजावट आहे; कारण भारतीय समाजातील मूळ संरचना अलोकशाही स्वरूपाची आहे.
– डॉ. बी. आर. आंबेडकर
इतिहास घडवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या बहुजन समाजाला इतिहासलेखनाचे मात्र भान नसावे, हे शल्य सर्वश्रुत सात शल्यांपेक्षाही अधिक जिव्हारी बोचणारे आहे. ते भान थोडे जरी असते, तरी सावित्रीबाई आणि जोतीराव फुले या क्रांतिकारी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचे दाहक, विदारक तपशील असे कायमचे भूतकाळात गाडले गेले नसते.
जोतीरावांचे मूलगामी चिंतन, दूरदर्शी विचार आणि देशी प्रतिभा थोडीफार तरी वाचकांपर्यंत पोहोचली, सावित्रीबाईंचे लेखन मात्र बव्हंशी कालगतच झालेले दिसते. तसा तर त्या उभयतांबाबत आजही ज्ञातापेक्षा अज्ञाताचाच प्रांत प्रचंड मोठा आहे.
जोतीरावांच्याही आधी ज्यांच्या कवनांना प्रसिद्धीचा प्रकाश दिसला त्या सावित्रीबाईंच्या साहित्यिक आणि सामाजिक कर्तृत्वाची साक्ष देणारी । फारच थोडी साधने आज हाताशी आहेत. त्यांचीच फिरवाफिरव करून उणीपुरी साठ छोटी-मोठी पुस्तके सावित्रीबाई फुल्यांवर प्रकाशित झाली असली तरी त्रुटी होती तशीच कायम आहे.
जी. ए. उगले यांचे प्रस्तुत छोटेखानी पुस्तक प्रयत्नांची योग्य दिशा दाखवणारे आहे. लेखक फुले परंपरेचा आस्थेवाईक; पण अभ्यासपूर्ण शोध घेऊ पाहत असल्यामुळे त्यांच्या लेखनात अभिनिवेश, भावविवशता किंवा अतिशयोक्ती नाही. आधार नसेल तिथे तो नाही हे सांगण्याची सचोटी आहे. नवी माहिती मिळवून वाचकांसमोर ठेवण्याची डोळस धडपडही आहे. उपलब्ध झालेले सर्व तपशील तपासून त्यात नवे गवसलेले जोडून उगले यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर आणि काव्यावर येथे प्रकाश टाकला आहे.
– भास्कर लक्ष्मण भोळ
From the Publisher




Publisher : Saket Prakashan
Publication date : 30 March 2026
Language : Marathi
Print length : 248 pages
ISBN-10 : 9371181869
ISBN-13 : 978-9371181860
Item Weight : 251 g
Dimensions : 14 x 1.5 x 21.5 cm
Country of Origin : India
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chh. Sambhaji Nagar 431005, Maharashtra, India, 7517745605
Generic Name : Book
Best Sellers Rank: #132,650 in Books (See Top 100 in Books) #130 in Public Administration #466 in Political Structure & Processes #613 in Political Freedom & Security (Books)

